महाराष्ट्र दिन संबंधी प्रश्न उत्तरे आणि माहिती

वाचा १ मे महाराष्ट्र दिन संबंधी प्रश्न आणि उत्तरे तसेच माहिती मराठी मध्ये. या माहितीची वापर तुम्ही महाराष्ट्र दिन निबंध लिहण्यासाठी किंवा महाराष्ट्र दिन भाषण देण्यासाठी देखील करू शकता.

महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

मुंबई हे एक व्यावसायिक बंदर म्हणून ब्रिटिशांच्या देखरेखीखाली होते. १९१७ मध्ये भाषावार प्रांतरचना करण्याची कल्पना “लोकशिंक्षण” या मासिकातून मांडली गेली होती. त्यात मुंबई प्रांत, मध्य, वऱ्हाड आणि हैद्राबाद येथे विखुरलेले मराठी भाषिक एकत्रित करून महाराष्ट्राची निर्मिती होण्याची अपेक्षा होती. १२ मे, १९४६ रोजी मराठी साहित्य संमेलनात संयुक्त मंहाराष्ट्रासंबंधीचा ठराव मांडण्यात आला. शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली या मागणीला चालना देण्यासाठी लगेचच सर्वपक्षीय महाराष्ट्र
एकत्रीकरण परिषद भरवण्यात आली.

राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. या निर्णयाच्या निषेधार्थ कामगारांचा एक विशाल मौर्चा गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!’ हे आंदोलनाचे घोषवाक्य बनले.

मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले. पोलिसांना आंदोलकांवर गोळीबाराचे आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मौरारजी देसाई यांनी दिले. या चळवळीत १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या हतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन ? मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. याच हतात्म्यांच्या बलिदानामुळे १मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींची माहिती

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी २१ नोव्हेंबर इ. स. १९५६ चे हुतात्मे रोजी जे आंदोलन झालं त्या आंदोलनात १०६ आंदोलक हुतात्मे झाले होते. त्या १०७ हुतात्म्यांची नावे:

  1. सिताराम बनाजी पवार
  2. जोसेफ डेव्हिड पेजारकर
  3. चिमणलाल डी. शेठ
  4. भास्कर नारायण कामतेकर
  5. रामचंद्र सेवाराम
  6. शंकर खोटे
  7. धर्माजी गंगाराम नागवेकर
  8. रामचंद्र लक्ष्मण जाधव
  9. के. जे. झेवियर
  10. पी. एस. जॉन
  11. शरद जी. वाणी
  12. वेदीसिंग
  13. रामचंद्र भाटीया
  14. गंगाराम गुणाजी
  15. गजानन ऊर्फ बंडू गोखले
  16. निवृत्ती विठोबा मोरे
  17. आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
  18. बालप्पा मुतण्णा कामाठी
  19. धोंडू लक्ष्मण पारडूले
  20. भाऊ सखाराम कदम
  21. यशवंत बाबाजी भगत
  22. गोविंद बाबूराव जोगल
  23. पांडूरंग धोंडू धाडवे
  24. गोपाळ चिमाजी कोरडे
  25. पांडूरंग बाबाजी जाधव
  26. बाबू हरी दाते
  27. अनुप माहावीर
  28. विनायक पांचाळ
  29. सिताराम गणपत म्हादे
  30. सुभाष भिवा बोरकर
  31. गणपत रामा तानकर
  32. सिताराम गयादीन
  33. गोरखनाथ रावजी जगताप
  34. महमद अली
  35. तुळशीराम पुंजाजी बेलसरे
  36. देवाजी सखाराम पाटील
  37. शामलाल जेठानंद
  38. सदाशिव महादेव भोसले
  39. भिकाजी पांडूरंग रंगाटे
  40. वासुदेव सुर्याजी मांजरेकर
  41. भिकाजी बाबू बांबरकर
  42. सखाराम श्रीपत ढमाले
  43. नरेंद्र नारायण प्रधान
  44. शंकर गोपाल कुष्टे
  45. दत्ताराम कृष्णा सावंत
  46. बबन बापू भरगुडे
  47. विष्णू सखाराम बने
  48. सिताराम धोंडू राडये
  49. तुकाराम धोंडू शिंदे
  50. विठ्ठल गंगाराम मोरे
  51. रामा लखन विंदा
  52. एडवीन आमब्रोझ साळवी
  53. बाबा महादू सावंत
  54. वसंत द्वारकानाथ कन्याळकर
  55. विठ्ठल दौलत साळुंखे
  56. रामनाथ पांडूरंग अमृते
  57. परशुराम अंबाजी देसाई
  58. घनश्याम बाबू कोलार
  59. धोंडू रामकृष्ण सुतार
  60. मुनीमजी बलदेव पांडे
  61. मारुती विठोबा म्हस्के
  62. भाऊ कोंडीबा भास्कर
  63. धोंडो राघो पुजारी
  64. ह्रुदयसिंग दारजेसिंग
  65. पांडू माहादू अवरीरकर
  66. शंकर विठोबा राणे
  67. विजयकुमार सदाशिव भडेकर
  68. कृष्णाजी गणू शिंदे
  69. रामचंद्र विठ्ठल चौगुले
  70. धोंडू भागू जाधव
  71. रघुनाथ सखाराम बीनगुडे
  72. काशीनाथ गोविंद चिंदरकर
  73. करपैया किरमल देवेंद्र
  74. चुलाराम मुंबराज
  75. बालमोहन
  76. अनंता
  77. गंगाराम विष्णू गुरव
  78. रत्नु गोंदिवरे
  79. सय्यद कासम
  80. भिकाजी दाजी
  81. अनंत गोलतकर
  82. किसन वीरकर
  83. सुखलाल रामलाल बंसकर
  84. पांडूरंग विष्णू वाळके
  85. फुलवरी मगरु
  86. गुलाब कृष्णा खवळे
  87. बाबूराव देवदास पाटील
  88. लक्ष्मण नरहरी थोरात
  89. ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
  90. गणपत रामा भुते
  91. मुनशी वझीऱअली
  92. दौलतराम मथुरादास
  93. विठ्ठल नारायण चव्हाण
  94. देवजी शिवन राठोड
  95. रावजीभाई डोसाभाई पटेल
  96. होरमसजी करसेटजी
  97. गिरधर हेमचंद लोहार
  98. सत्तू खंडू वाईकर
  99. गणपत श्रीधर जोशी
  100. माधव राजाराम तुरे(बेलदार)
  101. मारुती बेन्नाळकर
  102. मधूकर बापू बांदेकर
  103. लक्ष्मण गोविंद गावडे
  104. महादेव बारीगडी
  105. कमलाबाई मोहित
  106. सीताराम दुलाजी घाडीगावकर

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा कोणी केली?

३० एप्रिल १९६० रोजी नेहरूंनी महाराष्ट्र राज्याची घोषणा केली. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य देशाच्या नकाशावर अवतरलं. सयुंक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंती यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत सयुंक्त महाराष्ट्राचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली?

संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे, इ.स. १९६० रोजी झाली.

महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो?

१ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली म्हणून या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

Leave a Comment